जळगाव- प्रयागराज (Prayagraj) येथील महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांवर जळगावजवळ उधना येथे दगडफेक करण्यात आली.यात खिडकीच्या काचा फुटल्या. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. संबंधितांचा शोध सुरु आहे. प्रवाशांनी रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- हिंदू जनजागृती समिती
या घटनेमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून धार्मिक यात्रेकरूंवर होणाऱ्या अशा आक्रमणांना आता समाज सहन करणार नाही. कारसेवा करणाऱ्या रामभक्तांच्या बाबतीत गोध्रा इथे असाच प्रकार घडला होता. अमरनाथ यात्रेकरूंवरही दरवर्षी दगडफेक केली जाते. सध्या सामाजिक माध्यमांवरही काही धर्मांध मुसलमान ‘कुंभमेळा’ होऊ देणार नाही अशी धमकी देत आहेत. आता अशा प्रकारे रेल्वेवर दगडफेक करून त्यांनी प्रत्यक्ष कृती करायला प्रारंभ केल्याचे दिसत आहे. कोट्यवधी हिंदू भाविकांच्या उपस्थितीत होणार्या कुंभमेळ्यात हिंदू संघटित होऊ नयेत आणि त्यांनी धर्माचरण करू नये, म्हणून हिंदुविरोधी शक्ती कार्यरत आहेत. दोषींच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असून त्यांच्या मागे कोणत्या शक्ती आहेत, याची चौकशी व्हायला हवी. ‘सामाजिक माध्यमांवर कुंभमेळा होऊ देणार नाही’, असे म्हणणार्या धर्मांधांवरही शासनाने त्वरित कारवाई केली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.