महा कुंभाच्या निमित्ताने

SV    21-Jan-2025
Total Views |
 

भारतात ऋषी परंपरा खूप खूप प्राचीन काळापासून चालू आहे. साधू संन्याशांची परंपराही अतिशय जुनी असल्याचे मानतात. भगवान महावीर यांच्या जीवनचरित्रात नागा साधूच्या मार्गदर्शनाचा उल्लेख येतो. मात्र हे सर्व साधू संन्यासी स्वयंप्रेरणेने देशाच्या विविध भागात पर्वतगुहाजंगले यामधून कार्यरत असत. त्यांचे संघटीत  स्वरूपातील दर्शन सर्वसामान्यांना होत नसे. इसवीसनाच्या प्रारंभिक काळामध्ये भारतात सर्वत्र बौद्ध संप्रदायाचा प्रसार झालेला होता. वैदिक संस्कृतीवर कठोर आघात होत होते. सामाजिक विषमता तसेच अकर्मण्यवाद शिगेला पोहचला होता अशा वेळी शंकराचार्याचा उदय झाला. त्यांनी अद्वैत चिंतनाचा देशभर प्रचार केला. सामाजिक एकात्मता साधण्याच्या दृष्टीने दैदिप्यमान कामगिरी बजावली. पंथोपपंथांमध्ये ऐक्य भावना निर्माण करण्यात शंकराचार्य यशस्वी झाले. त्यांच्या कामाचाच एक भाग म्हणून देशाच्या चारही कोपऱ्यांमध्ये त्यांनी धर्मपिठांची स्थापना केली. द्वारकेमध्ये शारदा पीठपुरी येथे गोवर्धन पीठबद्रीनाथ येथे ज्योतिष पीठम्हैसूर येथे शृंगेरी पीठ स्थापिले गेलेया पीठांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाचे, राष्ट्रीय ऐक्य साधण्याचे तसेच एकात्मभाव सुदृढ करण्याचे प्रयत्न होऊ लागले. विखुरलेल्या साधू सज्जनांना एकत्रित करण्याचेसंघटीत करण्याचे प्रयत्नही होऊ लागले. सामाजिक ऐक्य आणि भक्तिवादाचे पुनःस्थापन करण्याचा एक भाग म्हणून देशातील चार मुख्य तीर्थक्षेत्री कुंभमेळ्याचे संघटीत स्वरूपातील आयोजन केले जाऊ लागले (हरिद्वारप्रयागउज्जैन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याची परंपरा होतीचतिला संघटीत रूप दिले गेले.) कुंभमेळ्याच्या वेळी देशभरातील सर्व साधू संन्यासी एकत्र येऊन आपली अंतर्गत रचना निश्चित करू लागलेभावी कार्याची योजना आखू लागले. कुंभमेळ्याचे स्थानहे सर्व साधूसंन्यासांच्या धार्मिक चर्चेचे तसेच गतीविर्धीच्या निश्चितीचे केंद्र झाले. दीर्घकालीन परकीय आक्रमणाच्या काळात  साधू संन्याशांचे एकत्र येणे ही गोष्ट सोपी नव्हती. पर्वणीचे निमित्त साधून धार्मिक जागरण आणि सामाजिक बळकटीसाठीचे प्रयत्न होत असत.  मठआखाड्यांची ती परंपरा आजतागायत चालू आहे.


सांस्कृतिक वार्तापत्र, 'महाकुंभ' विशेषांक ऑगस्ट २००३