देशभक्ती

14 May 2024 10:30:11
 
वयाच्या सोळाव्या वर्षी सावरकरांनी रचलेल्या चाफेकर नि रानडे या फटक्यात "शतावधी जे जन्मा येती मरोनि जाती ना गणती । देशासाठी मरती त्यासी देशपिते की बुध म्हणती ।।'' असे ते म्हणतात. “त्वकार्य  नैतिक सुसंमत सर्व देवा । तत्सेवनीच गमली रघुवीरसेवा ॥ असे 'माझे मृत्युपत्र’ या कवितेत त्यांनी  लिहिले होते. देवऋण, पितृऋण, ऋषिऋण फेडण्याची भावना त्यांच्या  ‘मरणोन्मुख शय्येवर’  ह्या कवितेत स्पष्ट झालेली आहे. पवित्र, उदात्त देशभक्ती व नम्र , कर्तव्य परायण, ऋण फेडण्याची भावना ह्यांचा  संगम सावरकरांच्या ठिकाणी झालेला  आहे.  ह्यामुळे आपल्या देशसेवेचे पारितोषिक आपणास मिळाले नाही ह्याचे त्यांना दु:ख  झाले नाही की आपली उपेक्षा झाली ह्याची त्यांना खंत वाटली नाही.
सावरकर विचारदर्शन
– डॉ. अरविंद गोडबोले 

Powered By Sangraha 9.0