मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन सुरू होताच परिणाम समोर

02 Mar 2025 14:37:06
 
         मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन सुरू होताच परिणाम समोर आले आहेत. मैतेई गटाकडून आपल्याकडील २४६ शस्त्र पोलिसांकडे स्वाधीन केली आहेत. आरमबाई तेंगोल या विद्रोही संघटनेने लुटलेली ही शस्त्र होती, जी त्यांनी प्रशासनाकडे सुपूर्द केली आहेत. 
मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला यांनी सर्व विद्रोही संघटनांना सात दिवसांची डेडलाईन दिली आहे, त्यानंतर मात्र अशा संघटनांवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. 

इंडिया टुडे २७.२.२५   
Powered By Sangraha 9.0