जम्मू- काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू

23 Apr 2025 10:48:21

Sanskrutik-Vartaptra_Dahashadvad_pahalgam-terror-attack-kashmir-tourists-killed
 
भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. यात २७ निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तपासात असे दिसून आले आहे की दहशतवाद्यांनी या हल्ल्याची संपूर्ण योजना आधीच तयार केली होती आणि त्यांचा उद्देश पर्यटन स्थळी गैर-काश्मिरींना लक्ष्य करणे होता.
 
तपासात आली मोठी माहिती समोर हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी परिसराची रेकी केल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि हल्ल्याची संपूर्ण रणनीती ठरवली. दहशतवाद्यांना स्थानिक ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGW) कडूनही मदत मिळाली. त्यांनी दहशतवाद्यांना केवळ शस्त्रेच पुरवली नाहीत तर हल्ल्यासाठी लॉजिस्टिक सपोर्ट देखील दिला. सुरक्षा संस्था हल्ल्याशी संबंधित सर्व माहितीची कसून चौकशी करत आहेत. या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे आणि दहशतवाद्यांचा शोध तीव्र करण्यात आला आहे.
  
दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू
या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतेक पर्यटक होते. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील हा सर्वात मोठा हल्ला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स भारताच्या दौऱ्यावर असताना आणि पर्यटन आणि ट्रेकिंग हंगाम जोर धरत असताना हा हल्ला झाला आहे. मृतांचा आकडा अधिक वाढण्याचीही शक्यता आहे.
 
दहशतवादी हल्ल्याबद्दल सुरक्षा अधिकाऱ्यांनी काय म्हटले?
पहलगाम शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरनमध्ये घनदाट पाइन जंगले आणि पर्वतांनी वेढलेले एक विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे. शिवाय ते पर्यटक आणि ट्रेकर्सचे आवडते ठिकाण आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, सशस्त्र दहशतवादी 'मिनी स्वित्झर्लंड' नावाच्या गवताळ प्रदेशात घुसले आणि त्यांनी रेस्टॉरंट्समध्ये बसलेल्या आणि फिरणाऱ्या पर्यटकांवर गोळीबार सुरू केला.
 
लोकसत्ता २३.४.२५
Powered By Sangraha 9.0